देवणी लक्ष्मण रणदिवे
देवणी : जिल्हाधिकारी लातूर यांच्या आदेशानुसार नैसर्गिक आपत्तीत शेतपिक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी येत्या २५ मार्चपर्यंत केवायसी करुन घेण्याचे आवाहन तहसीलदार यांनी केले आहे.
देवणी तालुक्यातील शेतकरी बांधवांनी नैसर्गिक आपत्तीत शेतपीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अद्याप e kyc केलेली नाही त्या शेतकऱ्यांनी २५ मार्च २०२५ पर्यंत ई केवायसी करुन घ्यावी अन्यथा अनुदान मिळणार नाही.तसेच प्रलंबित शेतकऱ्यांनी डेटा अपलोड २५ मार्चपर्यंत होईल याची नोंद घ्यावी.असे आवाहन तहसीलदार सोमनाथ वाडकर यांनी केले आहे.
