Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

साक्षगंध सोहळ्यात हजारो मतदारांना तहसीलदाराने दिली शपथ -तहसीलदार शिवाजी पालेपाड यांनी १००% मतदान करण्यासाठी केले आवाहन


दि.२९ अहमदपूर प्रतिनिधी 

लोकशाहीचा महापर्व ७ मे २०२४ रोजी होणाऱ्या लातूर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी हजारोंच्या संख्येने उपस्थितीत प्रसाद गार्डन अहमदपूर येथे दि.२९ रोजी दुपारी घोटे परीवाराच्या साक्षगंध सोहळ्यात तहसील कार्यालयाच्या वतीने स्वीप पथकाने केली मतदान जनजागृती.

    नवरा मुलाकडील पाच सुवासिनी बायका मुलीला गंध, टिक्का लावणे व नवरा मुलीकडील पाच सुवासिनी बायका मुलाला गंध, टिक्का लावणे.त्यानंतर भावी पतिपत्नी एकमेकांना पसंत असल्याची जाणीव म्हणून एकमेकांना अंगठी घालतात.या सोहळ्यास साक्षगंध सोहळा म्हणतात.या सोहळ्यातील भावी पतीपत्नी सह पालक,नातेवाईक,पाहुणे मंडळींना तहसील कार्यालय अहमदपूरच्या वतीने तहसीलदार शिवाजी पालेपाड स्वीप पथक प्रमुख महादेव खळुरे,मोहन तेलंगे,शिवकुमार गुळवे,बस्वेश्वर थोटे यांच्या उपस्थितीत पाहुण्यांना स्वीप सदस्य कपिल बिरादार यांनी ७ मे रोजी मतदान करण्यासाठीची शपथ दिली.तसेच मी मतदान करणार असे घोषवाक्याचे फलक हातात घेऊन मंडपातील मतदार बंधूना लोकसभा निवडणूकीसाठी मतदान करण्याचे आवाहन केले.

    यावेळी तहसीलदार शिवाजी पालेपाड यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत प्रत्येक मतदारांनी ७ मे रोजी आपला हक्क बजवावा.आपल्या कुटुंबातील प्रत्येक मतदारांनी इतरांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करुन मतदानाची टक्केवारी वाढविण्याचा प्रयत्न करुन राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदवावे असे आवाहन केले.

      जनजागृती कार्यक्रमाचे प्रास्तविक उपमुख्याध्यापक राजकुमार घोटे तर आभार यशवंतराव घोटे यांनी मानले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.