अहमदपूर (प्रतिनिधी )
लातूर लोकसभा विभागाच्यावतीने जिल्हातील मतदार बंधू भगिणीमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी स्वीप कलापथकाद्वारे चाकूर व अहमदपूर तालुक्यातील ९६ गावामध्ये प्रबोधनात्मक लोक गीते,भारुड,गोंधळ,पोवाडा,
गवळण अशा गीताच्या माध्यमातून तसेच पथनाट्यातून जनजागृती करण्यात येत असून यावेळी मौजे बेलूर येथे चावडीवर स्वीप पथकाने उपस्थित मतदार बंधूंना विविध प्रश्नाच्या माध्यमातून चर्चा घडवून आणले.तसेच नवीन तरुण मतदार बंधुला मतदानासाठी शुभेच्छा देण्यात आले.व मुलाखतीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.
लातूर लोकसभा मतदारसंघातील मतदानाचा टक्का वाढवा यासाठी
दि.२४ रोजी सायंकाळी बेलूर या गावातील मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले.व शंभर टक्के मतदान करावे असे जाहीर आवाहन स्वीप पथकातर्फे करण्यात आले.
निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा म्हणजे मतदान, त्यात नागरिकांना मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविण्याची गरज आहे.लोकशाहीत नागरिकांना मतदानाचा हक्क दिला आहे. तो केवळ हक्क नसून आपले कर्तव्य सुद्धा आहे.
मतदार राजा जागा हो,लोकशाहीचा धागा हो.. जनतेत चर्चा घडवून महादेव खळुरे यांनी मतदानाचे महत्त्व पटवून दिले.
या अभियानांसाठी जिल्हाधिकारी वर्षा घुगे-ठाकुर सहाय्यक निर्णय निवडणूक अधिकारी मंजुषा लटपटे,अहमदपूर चे तहसीलदार, शिवाजी पालेपाड,चाकूरचे तहसीलदार नरसिंग जाधव, गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात स्वीप पथकाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. सदरील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वीप पथक प्रमुख महादेव खळुरे,शिवकुमार गुळवे,मोहन तेलंगे,नागनाथ स्वामी,बस्वेश्वर थोटे,श्रीमती अर्चना माने,पुरुषोत्तम काळे यांच्यासह बेलूरचे तलाठी नवनीत जामनिक पोलीस पाटील भगवान सूर्यवंशी , उत्तम सूर्यवंशी ,शीतल आकनगिरे ,बीएलओ संगमेश्वर दावनगावे व,अजिंक्य सूर्यवंशी , अनिकेत उपासे,आनंदराव सूर्यवंशी,पुंडलिक सूर्यवंशी,प्रविण उपासे ,आरूप प्राटील,सत्यवान उपासे,राजेंद्र गुणाले यासह गावकरी मतदार बंधूची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्तविक मोहन तेलंगे तर उपस्थितीतांचे आभार पुरुषोत्तम काळे यांनी मानले.
